काळजाचं जळणं…

0
15

काळजाचं जळणं…

आपलं माणुस बघता बघता…
दुसर्याचा हात हातात घेऊन जातं…
ते पाहून काळजाचं जळणं काय असतं
ते कळतं…
आपल्या आवाजाने जिला तृप्ती मिळते
ती नवीन आवाजात चिंब भिजून जात असेल…
तेव्हा पावसात ही आग पेटते डोक्यात…
आगीची दाह काय असते.. तेव्हा च कळते..
आपल्या ला पाहून जी नेहमी स्माईल देते..
ती आता पाहून न पाहिल्या सारखं करते
तेव्हा देवाने डोळे च दिले नसते.. तर किती बरं झालं असतं..
असं काळजात वाटतं..
रोज सतत मेसेज करणारी ती..
आता चार चार दिवस
ढुंकूनही मोबाईल पहात नाही…
तेव्हा मोबाईल चा शोध लागला नसता तर बरं झालं असतं.. असं मनापासून वाटतं…
जिला आपलं काळीज मानलं..तीच निर्दय पणे काळीज चिरत जाते..
तेव्हा देवाने काळीज माणसाला दिलंच कशाला ‌….
असं राहून राहून वाटत
असं राहून राहून वाटत

नितीन कुमार शेंडे
बारामती

Previous article(कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास कविता)आठवणींचे पक्षी
Next articleओबीसी महामंडळाची एकरकमी परतावा योजना
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here