बारामती – विकास, शिक्षण आणि राजकारणाचा अभिमानास्पद वारसा

0
18

साप्ताहिक भावनगरी इनसाईड स्टोरी :

बारामती हे केवळ एक शहर नसून एक अशी भूमी आहे जिथे राजकारण, सामाजिक विकास, शिक्षण आणि संस्कृती यांची एक सुंदर सांगड पाहायला मिळते. इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक नेता बारामतीच्या अस्मितेचा भाग आहे. बारामतीच्या शहर व तालुक्यातील विविध उपक्रम, विकासाच्या योजना आणि राजकीय विचारसरणी हे इथल्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी घडवणारे ठरले आहेत.

शिक्षण आणि सामाजिक प्रगतीचा आदर्श मॉडेल
बारामती आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही शिक्षण क्षेत्रात एक मोठे नाव झाले आहे. कृषी विज्ञान केंद्र असो किंवा विद्या प्रतिष्ठान, या संस्था आज केवळ मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेल्या नसून त्यांनी बारामतीचे नाव अभिमानास्पदरीत्या जगाच्या पटलावर नेले आहे. येथे सुरु झालेल्या आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अभ्यासक्रमांनी बारामतीचे ऐतिहासिक महत्व पुनर्स्थापित करून दिले आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना उच्च दर्जाचे शिक्षण, कौशल्य आणि मार्गदर्शन देऊन त्यांचे भविष्य उजळले जात आहे.

पवार घराणे – बारामतीच्या विकासाचे आधारस्तंभ

बारामतीच्या विकासामध्ये पवार कुटुंबीयांचे योगदान उल्लेखनीय आहे. माननीय शरद पवार साहेब , अजितदादा पवार आणि राजेंद्रदादा
यांनी बारामतीच्या प्रत्येक भागात प्रगतीचे बीज पेरले. आज त्याचे वटवृक्ष झालेले हे विकास कार्य प्रत्येक बारामतीकराला अभिमानास्पद वाटते. पवार घराण्यातील प्रत्येक सदस्याने, मग त्या आदरणीय सौ. सुनंदा वहिनी, सौ. सुनेत्रा वहिनी सौ. शर्मिला वहिनी असोत, सर्वांनीच आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक कार्यातही मोलाची भूमिका बजावली आहे.

खासदार सुप्रिया सुळे ताई यांनी दिल्लीच्या राजकीय पटलावर बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यांची प्रभावी मांडणी केली. त्याचबरोबर तरुण नेते रोहित पवार, योगेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार हेही आपल्या कार्यातून बारामतीच्या विकासाचा वारसा चालवत आहेत.
राजकारणाच्या पलीकडे – सामाजिक बांधिलकी
बारामतीचे वैशिष्ट्य म्हणजे इथले राजकारण कधीच केवळ सत्तेचे साधन राहिले नाही, तर ते विकासाच्या दृष्टीकोनातून चालविले गेले आहे. येथे प्रत्येक निर्णय बारामतीच्या मातीसाठी, इथल्या माणसांसाठी आणि इथल्या भावी पिढ्यांसाठी घेतला जातो. त्यामुळेच आज बारामती हे देशात एक आदर्श ठरले आहे. पवार कुटुंबीयांनी राजकारणात आपल्या कामगिरीच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे राजकीय निर्णय आणि सामाजिक योगदान हे बारामतीकरांच्या हिताचा विचार करूनच घेतले जात असल्यामुळेच बारामतीने एक वेगळे आणि उंच शिखर गाठले आहे .
आज देशात ऐतिहासिक बारामती हे केवळ एक गाव, एक शहर किंवा एक तालुका नसून एक विचारधारा आहे. एक अशी विचारधारा जिथे शिक्षण, विकास आणि सामाजिक बांधिलकी हेच अंतिम ध्येय आहे. बारामतीच्या विकासाचा हा प्रवास थांबणारा नाही, तर प्रत्येक पिढीसोबत हा वटवृक्ष आणखीन मोठा आणि समृद्ध होत राहील, याची खात्री प्रत्येक बारामतीकराच्या मनात आहे. साथ बारामतीकरांची नक्कीच मिळते .इथला सुज्ञ व जागृत मतदार जनता जनार्दन त्यांच्या सतत पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे ही तितकच खरे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here