Homeलेखदेशाच्या 'विकास इंजिना'ला गती… मुख्यमंत्री

देशाच्या ‘विकास इंजिना’ला गती… मुख्यमंत्री

देशाच्या 'विकास इंजिना'ला गती… मुख्यमंत्री

देशाच्या ‘विकास इंजिना’ला गती…

भारत एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. महाराष्ट्र त्यात योगदान देण्यासाठी मेट्रो, सागरी किनारा मार्ग, सागरी सेतू, विमानतळ यांसारख्या विविध पायाभूत सुविधांचे जाळे विणून देशाच्या विकासाचे इंजिन हे बिरुद सार्थ ठरवत आहे…

एकनाथ शिंदे =महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच देशाच्या प्रगतीत, विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती-सिंचन, ज्ञान-विज्ञान, अभियांत्रिकी उद्योग आशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र सतत आघाडीवर होता आणि आजही आहे . केवळ राष्ट्रीय नको, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राची पुरोगामी-प्रागतिक विचारांचे राज्य महणून ख्याती आहे. आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीबाबत महाराष्ट्राचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. हा आदर कायम राखण्यासाठी मी आणि माझे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. उद्योगासोबतच पायाभूत सुविधांची निर्मिती, तंत्रज्ञानाधारित शेती अशा विविध विभागांमध्ये आज महाराष्ट्र दिशादर्शक काम करत आहे.

महाराष्ट्राने नेहमीच विविध क्षेत्रांत भारताचे नेतृत्व
केले आहे. त्यामुळेच आपल्या राज्याला भारताचे विकास इंजिन म्हटले जाते. हे इंजिन वेगाने दौडावे, यासाठी आम्ही विविध योजना अमलात आणत आहोत. आज देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महारष्ट्रात सुरू आहेत. राज्यात आठ लाख २५ हजार कोटी रुपये खर्चाची विक्रमी विकासकामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५३ हजार ५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ही सर्व कामे निधर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्राचे पाठबळ आहेच. त्याशिवाय डबल इजिन सरकारामुळे राज्याची विश्वासार्हता वाढली आहे. महाराष्ट्राची ‘पत’ सुधारल्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था सहकार्याचा हात पुढे करत आहेत.

मुंबई हे अंतरराष्ट्रीय शहर आहे, देशाची आर्थिक राजधान आहे देशाच्या आर्थिक वाटचालीत तिच्या या लौकिकाला साजेस योगदान मिळाले पाहिजे, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. अनेक महकांक्षी प्रकल्पदृष्टिपथात आहेत. (शुक्रवार, १२ जानेवारी२०२४रोजी)देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूचे (अटलसेतू) लोकार्पण होत आहे.हा देशातील सर्वाधिक लांबीचा (२२किमी.) सागरी सेतू आहे. मुंबई – नवी मुंबई,पुणे,गोवा यांना तो जोडणार आहे.या सेतूमुळे एमएमआर क्षेत्रातील

बाहतुकीच्या पायाभूत सुविधा नव्या उंचीवर नेणे शक्य झाले आहे. मुबंईकरांना रायगड जिल्यात जाण्यासाठी सध्या
दोन तास लागतात. अटलसेतूमुळे हे अंतर अवघ्या २० मिनिटांवर आले आहे. या सागरी सेतूच्या बांधकामात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या जहाजांच्या वाहतुकीत अडथळा येऊ नये, यासाठी १८० मीटर लांबीचे ऑथ्रो ट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) उभारले आहेत. फ्लेमिंगोंना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी ध्वनिरोधक (नॉइज बॅरिअर) बसविले आहेत. खारफुटी आणि खाडीची हानी होणार नाही, याची काळजी घेतली आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र ( बीएआरसी)आणि बीपीसीएलचे टर्मिनलस् यासारख्या संवेदनशील क्षेत्रांच्या संरक्षणासाठी योग्य ठिकाणी ‘विज्युअल बॅरिअर्स’ लावले आहेत. ‘रिव्हर्स सक्युलेशन ड्रिल’ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आपण जेवढे पोलाद वापरले आहे,त्यातून चार हावड़ा ब्रिज आणि सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बांधता येतील. प्रकल्पातील तारांची लांबी विचारात घेतली तर त्यांची पृथ्वीभोवती दोन वेटोळी होऊ शकतील. नैसर्गिक आपत्तींतही अटल सेतू सुरक्षित राहावा, यासाठी जपानी तंत्रज्ञान वापरले आहे. सेतूवरून ताशी १०० किमी वेगाने प्रवास करता येणार आहे. त्यावर रोज ७० हजार वाहने धावू शकतील, राज्याच्या या जागतिक दर्जाच्या सागरी सेतुमुळे
शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही लवकरच पूर्ण होत आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसा प्रस्ताव केंद्राला सादर केला आहे. हे विमानतळ आणि अटलसेतु मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या भागांचा कायपालट करतील. राज्य सरकारने एमएमआरडीएला नवीन शहर विकास प्राधिकरण (एनटीडीए) म्हणून नियुक्त करून अटलसेतूने जोडल्या जाणाऱ्या क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे मुंबई महानगर परिसराच्या आसपासच्या इतर काही भागातही शहरी विकास, आर्थिक वाढ व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएद्वार विकासकेंद्रांची कल्पना महिन्यात आली आहे. मुंबईत ३३७ किमी लांबीचे मेट्री नेटवर्क टयाटप्याने सुरू होत आहे. कुलाबा ते सिर्फ या मेट्रो तीनचे काम अहंकारापोटी रोखण्यात आले होते. परंतु, आम्ही त्या कामाला गती दिली.या मर्गिकेच्या पहिल्या तप्याचे लोकार्पणही या वर्षात होत आहे. उर्वरित मेट्रो मार्गही पुढील दोन ते तीन वर्षांत कार्यान्वित होतील. या मेट्रोजोडणीमुळे डणीमुळे एमएमआरमधील रस्त्यांवरील किमान ३० ते ३५लाख वाहने कमी होतील, असा अंदाज आहे. नरिमन पॉइंट ते वरळी या ११ किमी लांबीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्यात आहे. भारतात प्रथमच सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बोगद्यात ‘संकाडों’ ही वायुविजन यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे बोगद्यातून धूर बाहेर फेकण्याचे काम केले जाईल, लवकरच त्याचेही लोकार्पण होईल. किनारा मार्गामुळे सुमारे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होईल, तसेच प्रदूषणही घटेल. किनारा मार्गाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. त्याशिवाय वर्सोवा- वद्रि सागरी सेतूचे कामही सुरू झाले आहे. त्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विस्तार पालघरपर्यंत करण्याचा विचार आहे. पूर्व मुक्त मार्गाचा (इंस्टन फ्री वे) विस्तार ठाण्यापर्यंत करण्याचेही नियोजन आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे. त्याच्या तिसन्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच होणार आहे. या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह मुंबई-पुणे द्रुतगती महामागांवरील मिसिंग लिकच्या कामाचाही मी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेत आहे. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या कामालाही चालना दिली जात आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर केले असून आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेट्टी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गची आखणी गुरू आहे. राज्यातील खेड्यापाड्यांतील पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम करण्यासाठीही ठोस आणि सर्वकष प्रयत्न केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील या पायाभूत सुविधांसह, रेल्वे मार्गाच्या विस्ताराला जाणीवपूर्वक बळ दिले आहे. राज्यातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठीही केंद्राचे विशेष पाठबळ लाभत आहे. त्यासाठी पंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात २००९-२०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. सुमारे १३ हजार ५३९ कोटी रुपयांची ही भरीव तरतूद आहे. वंदे भारत या श्रेणीतही महाराष्ट्राला सात नव्या रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील बंद भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती लातूर येथील कारखान्यात होणार आहे.आजच्या घडीला
रेल्वेमार्फत राज्यात तब्बल १ लाख ७ हजारकोटींची कामे प्रगतिपथावर आहेत.

जगभरातील उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे आकर्षणाचे केंद्र आहे. मजबूत असे पायाभूत सुविधांचे जाळे आणि कुशल मनुष्यबळ, यामुळे गुंतवणुकीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्राला पसंती दिली जाते. पायाभूत सुविधा जर भक्कम असतील तर परदेशी गुंतवणूकदारही आकर्षित होतात. गेल्या वर्षी दावोस येथील वल्डं इकॉनॉमिक फोरम’ च्या माध्यमातून एक लाख ३० हजार कोटी गुंतवणुकीच्या उद्योग प्रकल्पांसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले. यातील ८५ टक्के गुंतवणूकदारांना भूखंड देण्यात आले असून, त्यांचे प्रकल्प आकारास येत आहेत. मधल्या अडीच वर्षाच्या काळात परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. गुजरात आणि कर्नाटकनेही आपल्याला मागे टाकले होते. परंतु, गेल्या वर्षभरात राज्याने पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतालो आहे. आज महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पहिल्या स्थानों आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या धडाडीमुळे देशाच्या प्रगतीला बुलेटचा वेग प्राप्त झाला आहे. गेल्या नऊ वर्षांत आपण सकारात्मक परिवर्तनाचे साक्षीदार ठरलो आहोत. आल्हाने आणि स्थित्यंतरेही आलो, परंतु समर्थ आणि समतोल नेतृत्वामुळे आपण त्यांच्यावर मात केली आहे. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांचा सामना करत असताना भारत एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता म्हणून आपण स्थान निर्माण केले आहेच, वेल्या काही वर्षातच आपण तिसन्या क्रमांकावर झेप घेऊ ‘एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग’ सारख्या अनेक जागतिक पतनामांकन संस्थांनीही त्याला पुष्टी दिली आहे.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत’चा आग्रह धरला आहे. त्याला अनुसरून अनेक योजना, धोरणांची आखणी केली आहे महाराष्ट्रानेही यासाठी योगदान देण्याचे नियोजन केले असून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलसंपवीत विस्तारण्याचा प्रयन सरकार नेटाने करत आहे. अधिक सधन, अधिक सुफल अशा महाराष्ट्राचे एक सुंदर स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on