बारामती प्रतिनिधी: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात अति उष्णतेचा कहर झाला असून जन माणसाला भर रस्त्यात फिरायला नको नकोस वाटायला लागले आहे..
![](https://i0.wp.com/bhavnagari.in/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023-05-23-15-03-45-12_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e73.jpg?resize=696%2C686&ssl=1)
त्यातच आज दिनांक २३/ ५ /२०२३ रोजी बारामतीच्या एमआयडीसीतील पेन्सिल चौक जवळील विद्या कॉर्नरच्या खालील पार्किंगला अज्ञात टू व्हीलरने अचानक भर उन्हात गाडीने पेट घेतल्याने यावरून उन्हाळ्याची दहाकता जाणवत आहे..
सध्या उन्हाने कहर केलेला असून अनेकांना बाहेर रस्त्यावर येणे मुश्किलीचे झालेले आहे. त्यातच वयोवृद्धांचे विविध कामगारांचे तसेच जनतेचे उन्हाच्या काहरामुळे जनजीवन अगदीच कसे विस्कळीत वाटू लागलेले आहे. प्रचंड उष्णतेचा दाहक जनमानसंना सहन होत नसल्याने रस्त्यावर गर्दी ही नाही.. ॲनं दुपारच्यावेळेस अंगाची लाही.. लाही जनमानसाला उष्ण पहाराचे वातावरण हालाखीचे व त्रासदायक असे झालेले आहे. . त्यातच परवा रात्रीही संभाजीनगर या भागात फोर व्हीलर ने पेट घेतल्याचे समजते आहे. जनमानसात भीतीचे वातावरण उष्णतेच्या काहरमुळे निर्माण झालेले दिसून आहे.