युवकांना दिशा, महिलांना सन्मान, शेतकऱ्यांना आधार – अजित दादांचे योगदान

0
71

युवकांना दिशा, महिलांना सन्मान, शेतकऱ्यांना आधार – अजित दादांचे योगदान


  • अजित दादा पवार हे नाव म्हणजे दृढ नेतृत्व, ठोस निर्णयशक्ती आणि सर्वसामान्यांसाठी अखंड झगडणारे व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी छाप उमटवताना त्यांनी युवक, महिला आणि शेतकरी या समाजघटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
    अजित दादांनी कायम युवकांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात महाविद्यालये उभारली, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी नवे कार्यक्रम सुरू केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, रोजगार मेळावे, स्टार्टअपला चालना देणाऱ्या योजना यांच्यामार्फत त्यांनी नव्या पिढीला योग्य दिशा आणि बळ दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज हजारो युवक स्वावलंबी झाले आहेत.
    महिलांच्या सशक्तीकरणासाठी अजित दादांनी अनेक उपक्रम राबवले. स्वयंसहायता गटांना आर्थिक पाठबळ, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, सुरक्षिततेसाठी विशेष योजना आणि आरोग्य व शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून त्यांनी महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांना निर्णयप्रक्रियेत सामील होण्याची संधी मोठ्या प्रमाणावर मिळाली.
    शेतकऱ्यांचा विकास हा अजित दादांचा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन योजना, पीकविमा योजना, थेट शेतकरी बाजारांची निर्मिती, शेतकऱ्यांना तांत्रिक मदत आणि शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार यासाठी त्यांनी कटिबद्ध प्रयत्न केले. दुष्काळग्रस्त भागात पाणी योजनांद्वारे दिलासा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे असंख्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले.
    अजित दादांचे कार्य केवळ विशिष्ट घटकांपुरते मर्यादित नाही. समाजाच्या सर्व थरांमध्ये त्यांनी विकासाचा दीप प्रज्वलित केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत ठोसपणा, जलद निर्णयक्षमतेसह मानवी संवेदनशीलतेचा सुरेख समतोल दिसून येतो.

आज जेव्हा महाराष्ट्राची नव्या युगात वाटचाल सुरू आहे, तेव्हा अजित दादांचे योगदान हे एक भक्कम पाया ठरत आहे. त्यांची दूरदृष्टी, प्रामाणिक प्रयत्न आणि जनतेविषयी असलेली जिव्हाळ्याची भावना महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची हमी देतात………..
जलसमृद्ध मराठवाड्याकडे वाटचाल – अजित दादांना अभिनंदन!

मराठवाडा हा प्रदेश अनेक वर्षे दुष्काळाच्या छायेत होता. पाणीटंचाई, शेतीची संकटे आणि स्थलांतरित लोकसंख्या ही येथील दु:खाची जुनी कहाणी. पण आज परिस्थितीत सकारात्मक बदल घडत आहे आणि याचे श्रेय अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते.

उपमुख्यमंत्री असो किंवा जलसंपदा मंत्री म्हणून, अजित दादांनी मराठवाड्याच्या जलसिंचनासाठी अतुलनीय कार्य केले. पाण्याच्या समस्येची खरी व्याप्ती ओळखून त्यांनी लहान-मोठ्या जलसंधारण प्रकल्पांना गती दिली. वंचित भागांमध्ये जलसिंचनाची यंत्रणा मजबूत करण्यात त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.

मुख्य कार्य व उपक्रम:

जलयुक्त शिवार अभियानाला नवे बळ दिले.

मध्यम आणि लघुपाटबंधारे योजनांची कामे पूर्णत्वास नेली.

पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबवली.

शेततळे, नाला खोलीकरण, बंधारे उभारणी यांना प्रोत्साहन दिले.

नव्या सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस निधी मंजूर करून तत्काळ कामे सुरू केली.

या योजनांमुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. अनेक शेतकरी पुन्हा एकदा शेतीकडे वळले आहेत. पाणी टंचाईमुळे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी दादांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.

दादांचे ठाम नेतृत्व: अजित दादा केवळ योजनांची घोषणा करून थांबत नाहीत, तर त्यांच्या अंमलबजावणीवर देखील बारकाईने लक्ष ठेवतात. वेळोवेळी आढावे घेणे, अधिकाऱ्यांना ठोस सूचनांद्वारे मार्गदर्शन करणे आणि सर्व कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आग्रह धरणे – ही त्यांची कार्यशैली आहे.

जनतेचा आशीर्वाद: आज मराठवाड्याचा शेतकरी समाधानाने म्हणतो आहे – “आम्ही दुष्काळाचे दशावतार पाहिले होते, पण आता पाणीटंचाईवर मात करत समृद्धतेकडे वाटचाल करतो आहोत, याचे श्रेय अजित दादांना जाते.”

एक नवा सूर्य उगवतोय: जलसिंचनाच्या वाढीमुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. हा विकासाचा नवा सूर्योदय अजित दादांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे.

अजित दादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा जलसंपन्न भविष्याकडे प्रवास सुरू आहे!

लेखक सिद्धेश्वर वसंतराव सोळंके
सुत्रसंचालक तथा निवेदक गंगाखेड
मो. 7620462689

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here