कारखाना वाचवूया, एकत्र येऊया!” – पृथ्वीराज जाचक यांची अध्यक्षपदी एकमुखाने निवड…!

0
57

“कारखाना वाचवूया, एकत्र येऊया!” – पृथ्वीराज जाचक यांची अध्यक्षपदी एकमुखाने निवड!

तालुका थरारला… सभागृहात टाळ्यांचा गजर… आणि अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक (बापू)यांचं नाव जाहीर होताच, काही उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव!
आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी कोणतीही चुरस नाही, कोणताही संघर्ष नाही – फक्त एकच मंत्र: “शेतकरी हितासाठी एकत्र येऊया!” आणि त्या एकतेचं मूर्तिमंत रूप म्हणजे – पृथ्वीराज साहेबराव जाचक यांची एकमुखाने निवड!
‘मारुती ८००’ आली… आणि मन हेलावलं!


पृथ्वीराज जाचक जेव्हा त्यांच्या जुनी मारुती ८०० मधून कारखान्याच्या गेटपाशी पोहोचले, तेव्हा संपूर्ण वातावरण थांबून गेलं! गाडी थांबवून त्यांनी गेटसमोर जमिनीवर नतमस्तक होताच – उपस्थित शेतकरी, कामगार, कर्मचारी आणि जेष्ठ मंडळींच्या डोळ्यात अश्रू होते. “ही गाडी म्हणजे माझ्या संघर्षाची साक्ष आहे. आज मी इथे आहे, हे माझ्या वडिलांच्या, आजोबांच्या घामामुळेच!” – एवढं बोलून ते गप्प झाले… पण त्यांचं मौन अधिक बोलकं होतं.
सर्व गट, सर्व मते – एक दिशा! लासूर्णेपासून गुणवडीपर्यंत, अनुसूचित जातींपासून ओबीसी, महिलांपासून भटक्या-विमुक्तांपर्यंत – साऱ्यांनी एकत्र येऊन दिला एक संदेश – “आम्ही वेगळे असू शकतो, पण शेतकऱ्याच्या भल्यासाठी एकसंघ आहोत!”
“जय भवानी माता पॅनल”ने दाखवलेली संघटित ताकद म्हणजे शेतकरी मनगटातली आग आहे. सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी एकच नाव मांडलं – कोणतीही गटबाजी नाही, कोणताही विरोध नाही – फक्त शुद्ध, पवित्र, आत्म्याला भिडणारा सहकारभाव!


उपाध्यक्षपदी कैलास गावडे – कष्टाच्या माळेवरून आलेले, जमिनीशी नातं असलेले कैलास गावडे यांची उपाध्यक्षपदावर निवड हीही एक भावनांची लाट ठरली. “हे पद माझ्यासाठी सन्मान नाही, तर जबाबदारी आहे. कारखाना चालू ठेवणं म्हणजे हजारो शेतकरी कुटुंबांचं पोट चालवणं!” – असे म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी केली.
‘हा सत्तेचा खेळ नाही
अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली, या निवडणुकीत प्रामाणिकपणाचा विजय झाला. कुणी हरलं नाही, कुणी जिंकलं नाही – जिंकलं फक्त शेतकऱ्याचं भविष्य!
शेवटी एकच सूर – ‘संघर्ष आमचा वारसा – सहकार आमची शक्ती!’

आजचा दिवस कारखान्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात येईल. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आशेचा नवा उजेड दिसतोय. आणि सभासदांचा एकच निर्धार –
“एकत्र येऊया – कारखाना वाचवूया!”
“शेतकरी वर्गाला चालना देऊया…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here