“मुरूम युवा ग्रुप” – एका व्हाट्सअप ग्रुपने बदलले संपूर्ण गावाचे नशीब!
मुरूम – एक छोटंसं गाव, पण आज संपूर्ण लातूर जिल्ह्यात जिथं चर्चा आहे, ती फक्त आणि फक्त “मुरूम युवा ग्रुप” ची!
गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेहमीसारखा राजकारण, वादविवाद किंवा ट्रोलिंगचा विषय नसून, हाच व्हिडिओ एका सकारात्मक बदलाची साक्ष देतो – एका व्हाट्सअप ग्रुपच्या एका निर्णयामुळे संपूर्ण गावाचे भविष्यच उजळून निघाले!
प्रसंग होता दुर्दैवी. गावातील उच्चशिक्षित, हुशार पण आर्थिक अडचणीत सापडलेला “जानकर” नावाचा एक तरुण आत्महत्या करतो. गाव सुन्न. पण मुरूम युवा ग्रुप मात्र शांत बसला नाही! त्यांनी घेतला एक पक्का निर्धार – “हे थांबवायलाच हवं!”
त्या दिवशीपासून या ग्रुपने सुरू केली एक समाजहिताची मोहीम:
जानकर कुटुंबाला पाच शेळ्या देण्यात आल्या – स्वतःचे व्यवसाय उभा करण्यासाठी.
कुटुंबाला लागणारी जमीन नांगरून, मोगडून, बियाण्याच्या पैशांपासून ते खतापर्यंत सर्व काही पुरवण्यात आले.
पण एवढंच नाही – त्यावर एक अटही ठेवली – किमान पाच झाडं लावायचीच!
पण कहाणी इथेच संपत नाही…
या तरुणांच्या ग्रुपने पुढे सुरू केलं गावातील 600 एकर पडिक जमीन नांगरण्याचं व खत देण्याचं काम. अनेक शेतकऱ्यांना आधार दिला, त्यांच्या पडीक जमिनी पुन्हा सुवासिक केल्या. आज हे शेतकरी बी-बियाण्यासाठी घेतलेले कर्जही परतफेड करत आहेत! आत्महत्या करणारं मन, आता आशेने आणि मेहनतीने भरलेलं आहे.
मुरूम युवा ग्रुप – नाव अगदी साधं, पण काम जबरदस्त!
आज हे ग्रुप फक्त मुरूमचं नव्हे, तर लातूर जिल्ह्याचं प्रेरणास्थान बनलं आहे. भावना, संवेदना आणि कृती यांचा संगम म्हणजेच मुरूम युवा ग्रुप!
या ग्रुपच्या संपूर्ण सदस्यांचे, विशेषतः ‘भावनगरी’ यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
“आज तुम्ही बदल घडवताय, उद्या हे बदल देश घडवतील!”
जय हिंद! जय महाराष्ट्र!

