विडा येथील श्री.राजा हनुमान महाराज जयंती उत्सवाची जय्यत तयारी –जोरात गाव भक्तीमय वातावरण ….!

0
73

विडा येथील श्री.राजा हनुमान महाराज जयंती उत्सवाची जय्यत तयारी –जोरात गाव भक्तीमय वातावरण ….!

संतोष शिंदे बारामती: महाराष्ट्रातील विडा (ता. केज, जि. बीड) –
पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या राजा हनुमान महाराज जयंती उत्सवाची जय्यत तयारी विडा गावात सुरू
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या भव्य आणि दिव्य असां हा पारंपरिक हनुमान महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले समजते.

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील विडा तालुका केज जिल्हा बीड येथील श्री.राजा हनुमान मंदिर येथे श्री.ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर यांच्या अधिपत्याखाली कीर्तन भजन तसेच सप्ताह सात दिवस पारायण आसते. यंदाही सप्ताहभर धार्मिक कार्यक्रम, कीर्तन-भजन, आणि दि.१२ रोजी राजा हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सूर्योदयाला पंचक्रोशीतील लोक मिळून श्री .राजा हनुमान महाराजांची आरती, पालखी मिरवणूक आयोजित करण्यात येते. या गावातील प्रमुख मान्यवरांच्या व समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा सोहळा व गावातील कार्यक्रम माझ्या आयोजन…

सोबत लळीत, विविध वगनाट्य प्रमाणे सेवा , रात्रभर आराधना ,कुस्त्या, भंडारा चेही आयोजन करण्यात येत असते.

गावात साधू शिवरामपुरी महाराज (नागेशपुरीजी) समाधी स्थळ, श्रीकृष्ण मंदिर, आणि श्री. राजा हनुमान मंदिर हे गावकऱ्यांचे जागृत देवस्थान असल्याने भाविकांची मोठी उपस्थिती मोठ्या मनोभावे भक्तजन भाविक भक्त या दिवशी श्रद्धेने विडा गावी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी मुक्कामी असतात.

बंकटराव पटाईत लेझीम नियोजन, आवळे बंधू ढोल-ताशांचा गजर, आणि राजा हनुमान महाराजांच्या पालखीची मिरवणुक सकाळी मंदिराच्या भोवती हनुमान महाराज (फोटो) मूर्ती पालखीतून मिरवणूक प्रदक्षिणा असते.

गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवासाठी उत्सुक असतात.यासाठीच तयारीत मनोभावे गावकऱ्यांचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनचाही सहभाग असतो..!

यंदाही भंडाऱ्याचे भव्य आयोजन, नवसा निमित्त साखर वाटप, प्रसाद वितरण, व रेवड्यांची उधळण यामुळे भक्तांसाठी खास आनंदाचा क्षण ठरणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गावकरी या उत्सवासाठी विडा येथे येतात, हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.

राजा हनुमान महाराजांचा हा उत्सव श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक असून, पंचक्रोशीतील भाविकांसाठी तो एक अनमोल पर्वणी ठरतो. संपूर्ण गाव भक्तिमय,चैतन्यमय वातावरणात नाहून जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here