Homeलेखराजनिती का लक्ष्य,सिर्फ पैसे कमाना रह गया,झुठ को सच,सच को झुठ दिखाना...

राजनिती का लक्ष्य,सिर्फ पैसे कमाना रह गया,झुठ को सच,सच को झुठ दिखाना रह गया…!

राजकारण एक व्यवसाय : चर्चा

राजनिती का लक्ष्य,
सिर्फ पैसे कमाना रह गया,
झुठ को सच,
सच को झुठ दिखाना रह गया,
समाजसेवा के लिए सियासत मे आना
आकर नेता भरता खुदकाही खजाना

     महाराष्ट्रात आमदार आणि त्यांचा पक्ष चर्चेचा विषय असून राजकारणाचा खेळखंडोबा होत आहे.
Y
 आमदारांचे असे वागणे योग्य की अयोग्य? याबाबत चर्चा, सर्व्हे होत आहेत. 
तर दुसरीकडे असे करण्याच्या मागे स्वत:चे संरक्षण, खोक्यांची देवाण-घेवाण, (व्यापारी भाषेत लाख म्हणजे पेटी आणि खोके म्हणजे कोटी असा व्यवहार बोलतात.) तसेच राज्याच्या व मतदार संघाचा सर्वांगिण विकास व इतरही अनेक कारणांची चर्चा जोमात आहे.

           दरम्यान आमदारांना राज्याच्या तिजोरीतून अधिकृतरित्या काय काय मिळते? राजकारण हाच व्यवसाय कसा झाला? आमदारांना अनधिकृतरित्या आणखी काय मिळते? या बाबीची चर्चा प्रसारमाध्यमात व सोशल मीडियात झाली. बहुतांश नव्हे तब्बल ९४ ते ९६ टक्के आमदार करोडपती असल्याचे या निमित्ताने समोरही आले. 

एक न्यूज चॅनल ऊन्न्९ ने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आमदारांना मिळणारे वेतन, पेन्शन, खर्च व इतर सुविधा डोळे दीपविणार्‍या आहेत. आमदारांना मूळ वेतन १ लाख ८२ हजार रूपये, महागाई भत्ता ३९ हजार ७४८ रू., टपाल भत्ता - १० हजार रू., टेलिफोन भत्ता ८ हजार रू., संगणक चालकाचा पगार - १० हजार रूपये, पीएचा पगार ३० हजार रूपये, वाहन चालकाचा पगार ३० हजार रूपये, असे एकूण सुमारे ३ लाख रूपये दरमहा मिळतात. तसेच प्रत्येक बैठकीसाठी २ हजार रू. बैठक भत्ता असतो.

          आमदारांना लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर हे आमदार निधीतून तसेच वाहन घेतल्यास त्याचे व्याज सरकार भरते. तर दवाखान्याचा ९० टक्के खर्च सरकार करते. एडीआरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील २८८ पैकी २६६ आमदार कोट्याधिश आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाचे ९६% आमदार, भाजपाचे ९५%, दोन्ही शिवसेनेचे ९३% आणि राष्ट्रवादीचे ८९% आमदार हे कोट्याधिश आहेत. तर माजी आमदारांमध्ये एकूण ६०५ माजी आमदारांना दरमहा ५० ते ६० हजार रूपये पेन्शन, १०१ माजी आमदारांना ६१ ते ७० हजार रू. 
पेन्शन, ५१ माजी आमदारांना ८० हजार रू. पेन्शन तर १३ माजी आमदारांना एक लाखाचेवर पेन्शन दिल्या जाते.
 तर वारसांनाही पेन्शन मिळते.
        सदर आकडेवारीवरून एकवेळ आमदार झाले की कायमची चिंता मिटली. 
मतदार संघातील विकास कामांमध्ये टक्केवारी तसेच खोके व सरकारी दरबारी इतर कामांच्या संधीमधून अर्थपूर्ण विकास होतो, 
असे कार्यकर्ते सांगतात.
 आणि खाली विविध पदावर असतांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाच कित्ता गिरवितात.
    दरम्यान, ‘राजकारण हाच व्यवसाय असू शकतो का?’, या मथळ्याखाली सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 
कोणी लिहिले ते नाव नाही, वास्तविक ती पोस्ट चिंतनीय असून येथे त्यातील भाग नमूद करीत आहोत.
       ‘सध्या एक कोटी लोक फक्त राजकारण करून कोट्याधिश आहे!’ 

आज ज्या तीन क्षेत्रांनी देशाच्या नव्या पिढीला भुरळ घातली आहे ती म्हणजे चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. या तिन्ही क्षेत्रांतील लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा सर्व मर्यादेपलीकडे आहे. ही तिन्ही क्षेत्रे आधुनिक तरुणांचे आदर्श आहेत, तर त्यांच्या विश्वासार्हतेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बॉलीवूडमध्ये ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, गुंडगिरी आणि राजकारणात भ्रष्टाचार. या सगळ्यामागे पैसा हे मुख्य कारण आहे आणि हा पैसा आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. भारतातील ६ लाखांहून अधिक लोकांच्या रोजीरोटीला राजकारणाचा आधार असल्याचे नंतर एका सर्वेक्षणातून समोर आले. आज हा आकडा कोटींवर पोहोचला आहे. वास्तविक प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, समाजसेवक, लढाऊ, देशभक्त नागरिक तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण वातावरण तयार केले पाहिजे.
दुसरीकडे राज ठाकरे यांचा फोटो व नावासह एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, ‘देशात न विकले जाणारे आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री हवे असतील तर त्या देशात प्रथम न विकला जाणारा मतदार तयार होणे गरजेचे आहे’. यावरही चिंतन होणे गरजेचे आहे. शेवटी चिंतनासाठीच्या या आशयाच्या ओळी आठवतात…
चुनाव के समय रिेश्वत,
तो जनता को भी दी जाती है,
तो सिर्फ नेताओ को ही
क्यो बदनाम किया जाता है.

      - राजेश राजोरे
   खामगाव, जि. बुलढाणा.
           
Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on