
माळेगाव साखर कारखाना निवडणूक प्रचारास अजित पवारांच्या जाहीर नेतृत्वाखाली जोरदार प्रारंभ
“मीच अध्यक्ष, मीच ऑल-इन-वन” म्हणत अजितदादा पवारांचा निर्धार;

बारामती | माळेगाव | 14 जून 2025
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा निळकंठेश्वर पॅनलच्या वतीने भव्य शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज भाषणाने झाला. “मीच अध्यक्ष, मीच ऑल-इन-वन”, असे ठणकावून सांगत त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुढील पाच वर्षे स्वतःकडे असणार असल्याचे स्पष्ट केले.

“कारखान्याचं कामच नाही, तर सभासदांचं भलं, कामगारांचे प्रश्न, सर्वांना सामावून घेणं — सगळं मीच पाहणार आहे. माझ्या हयातीत तुम्ही जितका साथ द्याल, तितकी ताकद मी पणाला लावून तुमचं भलं करेन,” असे भावनिक शब्द वापरत पवार यांनी सभासदांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की “ज्या दिवशी मला वाटेल की माझ्यापेक्षा चांगला उमेदवार या बारामतीला लाभला तर, त्या दिवशी मी स्वतःहून बाजूला होईन.”


विरोधकांवर निशाणा
विरोधकांचा थेट उल्लेख न करता चंद्रराव तावरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत पवार म्हणाले, “प्रचारासाठी मुद्दे नसल्यामुळे काहीही बिनधास्त बोललं जातं. कर्ज आकडेवारी सांगितली जाते. पोती भिजली नसतानाही ती बिजली म्हणून मांडली जाते. चर्चा करायची असेल, तर समोर या!”सभासदांच्या हितासाठी वचनबद्ध अजित पवारांनी सभासदांना आश्वस्त केलं की कारखान्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि



सभासदांच्या हितासाठी सर्वोत्तम बाजारभाव मिळवण्याचा प्रयत्न पुढील पाच वर्षे केला जाणार आहे. “हे कारखानं राज्यातील सर्वोत्तम बनवणार,” असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. सभागृहात उसळला उत्साह पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात “अजितदादा जिंदाबाद”, एकच वादा अजितदादा!” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला भिडलेला दिसून आला.मान्यवरांची उपस्थिती या प्रचारसभेला विविध सहकारी संस्था, कारखाने व संस्थांतील मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रमुख उपस्थितीत:

अजित पवार – उपमुख्यमंत्री
राजवर्धन शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष
केशवराव (बापू) जगताप
बाळासाहेब तावरे
पृथ्वीराज (बापू) जाचक
पुरुषोत्तम जगताप
विश्वासराव( नाना) देवकाते संजय कोकरे, रविंद्र माने, संभाजीनाना होळकर, विक्रम भोसले आदी मान्यवर
सभेचे सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले, तर बाळासाहेब तावरे व केशवराव जगताप यांनी प्रास्ताविक करत विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.
निळकंठेश्वर पॅनलचा विजय निश्चित? पवारांच्या आत्मविश्वासपूर्ण भाषणातून, अनुभवातून व संघटनशक्तीमधून प्रचाराचा सूर स्पष्ट दिसतो आहे. निळकंठेश्वर पॅनलला मिळणारा प्रतिसाद पाहता, निवडणुकीचा कल निश्चितच त्यांच्या बाजूने झुकतो आहे. एकच निर्धार “विकासासाठी दादा, कारखान्यासाठी अजितदादा!