पैसा असूनही रिकामी मनं –

0
37

पैसा असूनही रिकामी मनं –

समृद्ध आणि प्रसिद्ध लोक आत्महत्या का करतात…

आपल्याला वाटतं की पैसा, प्रसिद्धी, समाजात मान-सन्मान मिळाला की माणूस आनंदी असतो, त्याचं जीवन सुरक्षित असतं. पण सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ही समजूत चुकीची वाटते. अगदी उच्चशिक्षित, प्रतिष्ठित, समृद्ध लोक जे समाजात मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते – त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

अलीकडच्या काही घटना:

१) डॉ. वळसणकर (सोलापूरचे न्युरोसर्जन): कालच आत्महत्या केली. एक यशस्वी डॉक्टर, समाजात मान असलेली व्यक्ती.

२) बाबासाहेब मनोहरे (लातूरचे मनपा आयुक्त): स्वतःवर गोळी झाडली, सध्या अत्यवस्थ.

३) भैयू महाराज: प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, समाजसेवक – पण अचानक आत्महत्या.

४) डॉ. शीतल आमटे: बाबा आमटे यांचं वारसत्त्व पुढे नेणाऱ्या, अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ विचारसंपन्न सामाजिक कार्यकर्त्या.

५) सुशांत सिंह राजपूत: प्रतिभावान कलाकार, त्याच्या आत्महत्येने सारा देश हादरला.

Virtual World vs Real Life :- यामध्ये विशेष विचार करायला लावणारा आहे. त्यांचं social media presence खूप प्रभावी होतं –Facebook,twitter ,Instagram ,YouTube वर हजारो followers, त्यांचे विचार, ऊर्जा, आणि समाजहिताचे व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारे होते. पण या आभासी जगात जेवढं कौतुक, तेवढंच त्यांच्या वास्तव आयुष्यात एकटेपण होतं. घरातील नातेसंबंध, विचारांचे मतभेद, किंवा अव्यक्त अस्वस्थता – या सर्व गोष्टी त्या व्हर्च्युअल कौतुकामागे दडलेल्या असतात हा विरोधाभास मनाला पोखरतो.

Virtual World म्हणजे काय ? Followers म्हणजे खरी साथ नसते.लाइक्स, कमेंट्स, views हे तात्पुरते समाधान देतात…

का घडतं असं ?

  1. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष डिप्रेशन, ऍन्झायटी, बर्नआउट हे सायलेंट किलर आहेत. समाजात प्रतिष्ठा जपताना हे कुणालाही सांगता येत नाही.
  2. एकटेपण आणि आंतरिक संघर्ष: गोंधळातही माणूस एकटा असतो. virtual जगात सक्रिय असूनही, घरात किंवा मनात असलेली पोकळी फार त्रासदायक असते.
  3. समाजाच्या अपेक्षा आणि दबाव तू इतका मोठा आहेस, तुला काय कमी
  4. वैयक्तिक आयुष्यातील तणाव कौटुंबिक मतभेद, नात्यातील क्लेश.
  5. मोठ्या जबाबदाऱ्यांचं ओझं आपण काय शिकायला हवं?
    मानसिक आरोग्यावर खुलेपणानं बोलणं.

केवळ आभासी जगात न अडकता खरे नातेसंबंध जपणं.
आपल्या जवळच्या लोकांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं.

एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटतंय, त्याचा अर्थ तो माणूसही एकदम ठिक आहेच असं मानू नका

शेवटी, माणूस मनाने आनंदी असावा लागतो – ना की बँक बॅलन्सने, ना फॉलोअर्सनी. Virtual World मध्ये कितीही ‘लाइव्ह’ दिसत असलो, खरे जीवन कधी कधी ‘म्युट’ असतं..

Previous articleएक आउटलेट हवा आहे
Next articleअजितदादा पवार – महाराष्ट्राचा जनतेचा रॉकेट नेता………..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here