अजितदादा पवार – महाराष्ट्राचा जनतेचा रॉकेट नेता………..!

0
54

अजितदादा पवार – महाराष्ट्राचा जनतेचा रॉकेट नेता………..!

जनतेच्या हक्कासाठी झपाटलेला योद्धा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा शिल्पकार!
लाडकी बहीण, मजबूत कंबर – महिलांचा खंबीर आधार!
अजितदादांनी उभ्या केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेने महाराष्ट्रातील कोट्यवधी भगिनींना दिला सन्मान, स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा नवा श्वास!
घरातल्या अडचणी, संसाराची जबाबदारी, अन् आत्मनिर्भरतेची तडफड – या साऱ्या प्रश्नांना एकाच योजनेतून उत्तर देणारे दादा म्हणजे खरे जननेते!
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणारे नेता!
कर्जमाफीपासून सिंचन प्रकल्पांपर्यंत, दादांनी शेतकऱ्यांच्या दुखण्यांना आधार देणारा हात पुढे केला.
येलदरी, सिद्धेश्वरसारखे प्रकल्प हे केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचे झरे आहेत – जे अजितदादांनी हक्काने उभे केले.


तरुणांसाठी रोजगाराचा महास्फोट!
स्टार्टअप्सना चालना, सरकारी भरतीला वेग, रोजगार मेळावे – यामुळे आज तरुणांच्या नजरेत आशेचा तेजस्वी झोत आहे.
दादांनी रोजगार फक्त आश्वासन नसून कृती असली पाहिजे हे कृतीतून सिद्ध केलं!
कामगारांसाठी लढणारा झुंजार सेनापती!
महागाईच्या झळा सोसणाऱ्या कामगारांना वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान – हे सगळं अजितदादांनी दिलं!
त्यांच्या नेतृत्वाने कामगारवर्गाच्या मनात आजही विश्वास जागवला आहे.
मराठवाड्याच्या मातीला पाणी, भविष्याला प्रकाश!
दुष्काळाच्या ओल्या स्मृतींना पुसून टाकणारे जलसिंचनाचे महायज्ञ अजितदादांनी उभे केले.
येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पांमुळे परभणी, हिंगोली, लातूर, बीडसारख्या जिल्ह्यांना जीवनरेषा मिळाली.
मराठवाड्याचं भविष्य अजितदादांच्या नियोजनात उजळून निघालंय!
बीड – दुष्काळातून विकासाकडे नेणारा मार्ग!
एकेकाळचा ‘दुष्काळी’ बीड आज रस्ते, वीज, आरोग्य, सिंचन, शिक्षण यामध्ये झपाट्याने बदलत चालला आहे.
अजितदादांनी केवळ निधी आणला नाही, तर स्वतः झोकून देत बीड जिल्ह्याचं नंदनवन घडवलं.

बारामती – आदर्शाचं ब्रँडिंग आणि महाराष्ट्रासाठी ब्लूप्रिंट!
बारामती म्हणजे अजितदादांचा स्वप्नवत प्रकल्प – जिथं विकासाच्या प्रत्येक छायाचित्रात त्यांचा ठसा आहे.
पण त्यांचं ध्येय केवळ बारामतीपुरतं नाही – “प्रत्येक तालुका बारामतीसारखा व्हावा!” हीच त्यांची महाराष्ट्रासाठीची कडवट तळमळ आहे.
म्हणूनच…
अजितदादा पवार हे केवळ नेता नाहीत – ते चळवळी आहेत, विश्वासाचं दुसरं नाव आहेत, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी लागलेली ठिणगी आहेत!

त्यांच्या दूरदृष्टीला, कार्यक्षमतेला, आणि महाराष्ट्रासाठीच्या अमोल योगदानाला – तमाम जनतेचा मानाचा मुजरा आणि लाख लाख अभिनंदन!

लेखक :
सिद्धेश्वर सोळंके, गंगाखेड
सूत्रसंचालक तथा निवेदक
मो. 7620462689

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here