कोणतेही स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःला हरवून जावे लागते – शास्त्रज्ञ व पदम विभूषण डाॅ.रघुनाथ माशालकर
![](https://i0.wp.com/bhavnagari.in/wp-content/uploads/2024/03/Screenshot_2024-03-25-08-37-42-55_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e72.jpg?resize=696%2C860&ssl=1)
पुणे जिल्हा संदर्भ सुनिल ज्ञानदेव भोसले
पुणे : कोणतेही स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःला हरवून जावे लागते. गोवा राज्यातील माशाल गावाचे विचार जगातील सर्व लहान थोरांनी स्विकारले आहे.
लहानपणी बारा वर्ष अनवाणी पायांनी फिरुन रोडवरच्या दिव्याखाली अभ्यास करुन जग जिकण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये वाढवले आहे.
एकशे शहात्तर देशाचे प्रतिनीधी म्हणून काम करताना आहिल्याटन्युटन पुस्तक जे आहे त्या पुस्तकात सही असनारे पहिले भारतीय एकमेव मराठी माणूस म्हणजे आजचे संशोधन महामंळडळाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली असे मत प्रख्यात शास्त्रज्ञ व पद्मीश्री, पदम विभुषण डाॅ रघुनाथ आनंत माशालकर यांनी व्यक्त केले.
![](https://i0.wp.com/bhavnagari.in/wp-content/uploads/2024/03/Screenshot_2024-03-25-08-37-28-85_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e72.jpg?resize=696%2C408&ssl=1)
माशालकर म्हणाले की ज्या समाजाला सतत कलंकित नजरेन पाहिले जात होते अशा पारधी समाजातुन दैनंदिन परिस्थितीमध्ये संघर्ष करुन पुढे येवून व आपल्या समाजातील पिढीत कुटुंबाना कलंकित जिवनातून बाहेर काढण्याचे नामदेव भोसले करत आहेत हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे.
आज मला भेटण्यासाठी पदमश्री डाॅ. रविंद्र कोल्हे व पदमश्री गजानन माणे, आदिवासी सेवक व साहित्यिक नामदेव भोसले, मा. अजय देशपांडे, श्रीमती. पदमश्री पेंढे यांना भेटुन अतिशय आनंद झाला आहे. यावेळी पदमविभूषण डाॅ रघुनाथ माशालकर यांना लोकप्रिय पुस्तक ये हाल भेट देऊन स्वागत केले.