राजकीय भूकंप! शरद पवारांची मोठी भूमिका बाजूला — दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? निर्णय सुप्रिया सुळे यांच्याकडे!
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी राजकीय भूकंपसदृश घटना घडली आहे. पुण्यातील एका खास कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्रजी पवार यांनी धक्कादायक विधान करत स्पष्ट केले की, “या प्रक्रियेमध्ये मी आता नाही, मी आता बाजूला होत आहे.”
त्यांनी याच वक्तव्यात आणखी एक मोठा संकेत दिला — “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर काय हरकत आहे?” अशा शब्दांत त्यांनी पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेचं दार उघडं ठेवलं. विशेष म्हणजे यासंदर्भातील निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असं सांगून त्यांनी आपल्या कन्येकडे पुढील राजकीय सूत्रं सोपवण्याचं संकेत दिलं आहे.
या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संबंध, दोन्ही राष्ट्रवादी गटांचा आगामी काळातील व्यवहार आणि संभाव्य विलिनीकरण या सगळ्याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हा जर विलिनीकरणाचा मार्ग सुरू झाला, तर पुढील राजकीय समीकरणं, सत्ता वाटप, आगामी निवडणुकीतील युती-आघाड्या, तसेच राज्यातील शासकीय डावपेच कसे असतील, हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे.
शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात नवा राजकीय अध्याय सुरू होतो आहे का? हे येणारा काळच ठरवेल! दादा आणि ताई यांचे विचारधारा नेक व एक आहेत त्याचमुळे हे दोघे बहिण भाऊंना परत राजकारणातल्या घरी एकत्र येतील अशी आशा आता बारामतीकरांनाही वाटू लागली आहेत याची हाक तर कविता पवार साहेबांनी परवा एका झालेल्या कार्यक्रमातून तसेच संकेतच दिल्याचे समजते आहे बघूया येणाऱ्या काळात होते काय….!
